Sunday, 7 July 2019

शालेय पोषण आहार


*प्रति*
*केंद्रप्रमुख /मुख्याध्यापक सर्व*    
*ता. सिल्लोड.*

*विषय :- दुष्काळग्रस्त/ टंचाईग्रस्त भागातील शाळांमध्ये सुट्टीच्या कालावधीत पूरक पोषण आहार देणे बाबत.*
संदर्भ;-1)मा. संचालक याचे आदेश
           2)मा.शिक्षणाधिकारी(प्रा.)जिल्हा परिषद औरंगाबाद

                 उपरोक्त संदर्भीय विषयान्वये आपणास सुचित करण्यात येते की, शालेय पोषण आहार योजनेअंतर्गत दुष्काळग्रस्त/टंचाईग्रस्त भागातील विद्यार्थ्यांना आठवड्यातील ३ दिवस दूध/अंडी/फळे/पौष्टिक आहार देण्याचा निर्णय संदर्भीय पत्रान्वये घेण्यात आलेला आहे.
  तरी दुष्काळग्रस्त/टंचाईग्रस्त गावातील शालेय पोषण आहार योजनेस पात्र शाळांमधील विद्यार्थ्यांना 3 दिवस पूरक आहार देण्याची सोबत दिलेल्या पत्रानुसार कार्यवाही करण्यात यावी, सदर कामात हयगय किंवा दिरंगाई केल्यास याची सर्वस्वी जबाबदारी मुख्याध्यापक यांची राहील.

सोबत:१)वेळा पत्रक व पत्र
          २)परिशिष्ट-ब आणि  परिशिष्ट-क

             
*गटशिक्षणाधिकारी*
*शालेय पोषण आहार*       
*पं  स सिल्लोड*

No comments:

Post a Comment